Ad will apear here
Next
‘उघड्यावर शौचास प्रतिबंध’ डिजिटल व्हॅनचे उद्घाटन
डिजिटल व्हॅनला हिरवा कंदील दाखवताना पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकरपालघर : ‘जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल गतिमान होऊन सर्वत्र स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी कार्यरत राहू. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून पालघर जिल्हा परिषदेचे कामकाज पारदर्शकरित्या करण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जनजागृतीसाठी ‘उघड्यावर शौचास प्रतिबंध’ या डिजिटल व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती खिलारे, महिला बालकल्याण अधिकारी राजेंद्र पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धुमाळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. पतंगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामस्थ व विद्यार्थी स्वच्छतेवरील माहितीपट व जाहिराती डिजिटल व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा, गावातील सार्वजनिक ठिकाणे, बाजार आणि ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

या व्हॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात १३ बाय आठचा डिजिटल स्क्रीन बोर्ड, पडदा ३६० अंशामध्ये फिरविण्याची सुविधा, १५ केव्हीची जनरेटर सुविधा, वायफाय, पाच हजार लोकांना एकाच जागेवर बसून पाहण्याची सुविधा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना उघड्यावर शौचास जाण्यास प्रतिबंध करणे व शासनामार्फत बांधून देण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश या उपक्रमामागे आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZWPBG
Similar Posts
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
राष्ट्रीय रूरबन मिशनअंतर्गत कासटवाडीची निवड जव्हार (पालघर) : केंद्र शासन पुरस्कृत श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानच्या अंमलबजावणीसाठी जव्हार तालुक्यातील ‘कासटवाडी’ समूहाची निवड करण्यात आली आहे.   आदिवासी भागातील गावसमूहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे, शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा या अभियानाचा मुख्य उदेश आहे. या योजनेंतर्गत
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language